News34 chandrapur
चंद्रपूर / यवतमाळ :- यवतमाळ जिल्ह्यातील मुकूटबन येथील बी. एस. इस्पात कोळसा खाणीव्दारे भु-संपादनाची कार्यवाही न करता संपादन प्रक्रियेपूर्वीच खनन कार्य सुरु केल्यामुळे मागासवर्गीय शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच प्रदुषणात वाढ झाली आहे. संबंधीत शेतकरी न्याय मागण्यांसाठी आंदोलन करित आहेत.
त्यांना न्याय मिळवून देण्याविषयी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. Obc commission of india
सदर तक्रारीची दखल गांभीर्याने घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची इत्यंभूत माहिती घेवून अन्यायग्रस्त मागासवर्गीय शेतकऱ्यांवर भुमी अधिग्रहणाबाबत होत असलेला अन्याय दूर करुन अधिग्रहणापूर्वी बी. एस. इस्पात कंपनीव्दारा होत असलेले उत्खनन न्यायसंगत आहे काय? अशी विचारणा करीत तातडीने हस्तक्षेप करण्याच्या सुचना देवून सविस्तर कार्यवाही अहवाल सादर करण्यास सुचित केले आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांमध्ये न्यायाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.