चंद्रपूर - विदर्भात लहान, युवा व वृद्ध नागरिकांमध्ये "खर्रा" हा सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. रोज खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण लाखोच्या संख्येत आहे मात्र हा पदार्थ खाल्ल्यावर आपल्या आरोग्यावर याचा मोठा दुष्परिणाम होत आहे.
या संदर्भात वर्ष 2017 ते 2021 या कालावधीत तब्बल 215 नागरिकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला आहे, ही आकडेवारी शासकीय असून खाजगी रुग्णालयातील आकडा मोठा आहे.
खर्रा चवीने खाणारे नागरिक दिवसातून 4 ते 5 वेळा हा पदार्थ सेवन करतात. Cancer
मात्र त्यावेळी हा खर्रा आपल्या शरीरात भयानक आजाराची देवाणही करीत असतो.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की खरर्यामुळे कॅन्सर कसा काय होतो?
याच उत्तर सरळ आहे, या खर्र्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मिश्रित केला जातो, त्यासोबत खराब सुपारी सुद्धा.
वर्ष 2012 पासून महाराष्ट्रात सुगंधित तंबाखूवर शासनाने प्रतिबंध लावला आहे, मात्र आजही सुगंधित तंबाखू सहजरित्या उपलब्ध होते.
खर्र्यात मिश्रित केल्या जाणारे हे पदार्थ जीवघेणेचं आहे.
सकाळी झोपेतून उठल्यावर शौचास जाण्यासाठी खर्रा किंवा तंबाकू हवाचं.
जोपर्यंत खर्रा व तंबाखूचे सेवन नागरिक करणार नाही तोपर्यंत शौचास जायला सुद्धा नागरिकांना अडथळा निर्माण होतो.
चंद्रपुरात मागील 4 वर्षात तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण वर्ष 2017 ते 18 या कालावधीत 61 रुग्ण, स्तन कॅन्सर 45, मानेचा कॅन्सर 27 इतर 63 असे एकूण 196 रुग्ण त्या वर्षात मिळाले होते.
2017 ते 19 मध्ये हा आकडा वाढला, त्यावेळी 130 रुग्ण, वर्ष 19 ते 20 या कालावधीत 107, 2020 ते 2021 वर्षात 30 रुग्ण व शेवटी 2020 ते 21 या कालावधीत 30 रुग्णांचा समावेश आहे.
मागील 4 वर्षातील हा आकडा बघितल्यास तब्बल 493 नागरिकांना कॅन्सरच्या आजाराने वेढून घेतले.
तोंडाचा कॅन्सर झाल्यावर उपचार करण्यासाठी लागणारा खर्च लाखों रुपयांच्या वर, उपचार घेतल्यावर कॅन्सर परत येण्याची शक्यता जास्त असते, युवा पिढी सध्या खर्र्याच्या आहारी गेली आहे, मात्र त्यामुळे नुकसानही युवा पिढीचंच आहे, 20 रुपयांच्या खर्र्यामुळे होणाऱ्या कॅन्सरने 5 ते 8 लाखांचा खर्च येत आहे. ही बाब गंभीर असली तरी यावर अजूनही प्रशासनाचे कठोर पावले उचलली नाही.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लागलेल्या लॉकडाउन मुळे युवकांनी खर्र्यासाठी 5 ते 10 किलोमीटर ची पायपीट करीत आपला शौक पूर्ण केला, मात्र त्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामावर फक्त रुग्णालयाची पायपीट करावी लागणार हे युवकांना समोर कळेल.
विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चंद्रपूर मनपाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते मात्र मनपाने किती नागरिकांवर कारवाई केली याबाबत आकडा कधीही जाहीर केला नाही.
कॅन्सरची लाट जर थांबवायची असेल तर प्रशासनाला युद्ध स्तरावर प्रयत्न करून सुगंधित तंबाखू व सडल्या सुपारीची तस्करी थांबवायला हवी, तेव्हाच पुढची पिढी कॅन्सर सारख्या गंभीर आजारा पासून स्वतःच रक्षण करू शकेल.
2 वर्षांपूर्वी जिल्ह्यात नकली सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड मारली होती, मात्र त्यानंतरही सुगंधित तंबाखूची विक्री सर्रासपणे सुरूच आहे.
जोपर्यंत प्रशासन माफियाविरोधात कठोर कायदे आणणार नाही तोपर्यंत हे माफिया सुगंधित तंबाखूच्या माध्यमातून समाजात कॅन्सर चे विष पेरतचं राहणार.
तम्बाकू व खर्रा राज्य सरकारने बैंड करावे
उत्तर द्याहटवासुपारी बंद करो kharra बंद हो जाएगा
हटवाखरे सरकारने व तंबाखू बंद करावे
उत्तर द्याहटवाकंपन्यांना सिल लावा
उत्तर द्याहटवातंबाकू बंद करायला हवा तेव्हा खर्रा बंद होते
उत्तर द्याहटवा