कोरपना - कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष,एका दै.वृत्तपत्र व पोर्टलचे तालुका प्रतिनिधी सैय्यद मूम्ताज़ अली यांनी काही दिवसांपूर्वी अंबुजा सिमेंट कामगार संघटना कार्याध्यक्ष तथा समाजसेवक विजय ठाकरे यांच्या लेखी तक्रारीवरून तामसी रिठ पैनगंगा नदीतील रेती चोरी प्रकरणी बातमी प्रकाशीत केली होती.याचा वचपा काढण्यासाठी कोरपनाचे तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांनी पत्रकार अली यांच्या विरोधात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांवर दबावतंत्राचा वापर केल्याचे कळताच धक्काच बसला.तहसीलदार वाकलेकर यांचे हे कृत्य त्यांच्या पदाला न शोभणारे आहे.तहसीलदार हे स्वतः कायद्याचे पालन करणारे तालुका दंडाधिकारी म्हणून एक जबाबदार पदावर विराजमान अधिकारी आहे.हे जर आपल्या पदाचा अशाप्रकारे गैरवापर करून सुडबुदद्धीने एखाद्या पत्रकारावर आपला वचपा काढण्याचा प्रयत्न करत असेल तर ही बाब अतिशय निंदनीय व पत्रकार स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून याची गळचेपी नको ? असे घडले असेल तर याचा मी निषेध करतो.असे मत "मित्रांगण युवा मंचचे अध्यक्ष हितेश चव्हाण" यांनी News34 पुढे व्यक्त केले आहे.
पत्रकार खंडणीखोर झाले आहेत, थोडी तरी पत्रकारिता इमानदारीने करा, अधिकाऱ्यांना धमकावणे, खऱ्याला खोटं करणे आज धंदा बनविला आहे
उत्तर द्याहटवा