प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - कारगिल युद्धात परिवाराला दुर सारून देशाला प्रथम प्राधान्य देणाऱ्या वीर जवानांना सलाम. हा विजय येणारी नवी पिढी कायम स्मरणात ठेवेल. सर्वांनी सध्या कोरोनाला आपला शत्रू समजून स्वयंस्फूर्तीने लस घेण्याचे आवाहन नगर परिषद मुलचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी केले. ते मुल तालुका छायाचित्रकार संघटना तसेच श्री साई मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने मा. सा. कन्नमवार सभागृह येथे २२ व्या कारगिल विजय दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर नायब तहसीलदार पृथ्वीराज साधणकर, न. प. अध्यक्षा रत्नमाला भोयर, जीवन कोंतमवार, विनोद कामडे, डॉ. पूजा महेशकर, विजय सिद्धावार, अशोक येरमे, माजी सैनिक बाबा सुर, फुलचंद मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षा नगराध्यक्षा रत्नमाला भोयर यांनी देशसेवेत मुल तालुक्याने या देशाला अनेक सैनिक देश रक्षणाकरीता दिलेले असून याचा आम्हाला अभिमान आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे येणाऱ्या नव्या पिढीला कायम स्मरण होत राहावे यासाठी मुल शहरात स्मारक उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी माजी सैनिकांचा आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह देवून जाहिर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात कलाशिक्षक भारत सलाम यांनी मंचावर सैनिकी जीवनावर आधारित चित्र रेखाटून उपस्थितांची मने जिंकली. रेखाटलेले चित्र नगर परिषद मुलला भेट देण्यात आले.
कला निकेतन चे अरविंद दहिवले, संतोषी, काजल, संस्कृती, राधा, मधुवंती, धनश्री, तेजस यांनी देशभक्ती गीते सादर केली.
कार्यक्रमाचा यशस्वितेकरीता सचिन वाकडे, रुपेश कोठारे, विवेक मुत्यालवार, संदीप मोहबे, बंडु साखलवार, नितीन अलगुनवार, रितिक पोगुलवार, पिंटु पिंपळे, रोहित अडगुरवार, कुमुद भोयर, अभिजित चेपुरवार, महेश भुरसे, प्रविण गभणे, कलानिकेतन तथा संच यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन सुजाता बरडे यांनी प्रास्ताविक अमित राऊत तर आभार वासु यांनी मानले.