वरोरा - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सपट्याने वाढत असून राज्य सरकारने कडक लॉकडाउन चे संकेत दिले आहे.
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असून स्थानिक प्रशासनाने 13 एप्रिल ते 18 एप्रिलपर्यंत जनता कर्फ्युची घोषणा केली आहे.
स्थानिक प्रशासनाने वरोरा शहरातील जनप्रतिनिधी व सामाजिक संस्था यांचे मत जाणून घेतले असता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक असल्याचे सांगितले या कर्फ्युत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.
नागरिकांनी आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाला सहकार्य करावे अशी विनंती तहसीलदार यांनी केली असून सध्या कोरोना रुग्णासाठी सिद्धिविनायक मंगल कार्यालय अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ज्यांना गृह विलीगिकरण शक्य नाही त्यांना या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे.