News34chandrapur
चंद्रपूर-अलीकडच्या काळात कौटुंबिक विसंवाद वाढत असल्याने कौटुंबिक समस्या (Family problems) निर्माण होत आहेत. एकमेकांशी मनमोकळ्या पणाने बोलून संवाद कायम ठेवला,कुरबुरी बाजूला ठेवून एकमेकांना समजून घेतले तर कौटुंबिक वाद दूर होतील व कुटुंब विभक्त होण्यापासूम वाचतील असे प्रतिपादन राष्ट्रीय मुस्लिम हक्क समितीचे प्रवक्ता ऍड. रफीक शेख यांनी केले. seminar
Save the family
जागृत मुस्लिम विकास बहुउदेशशिय संस्था चंद्रपूर आणि सामाजिक समता संघर्ष समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित परिवार तुटण्यापासून कसे वाचावे या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
National Muslim Rights Committee
बिनबा गेट परिसरातील बादशाह हॉटेल येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षतेखाली मुस्लिम विकास मंच चे अध्यक्ष हाजी सय्यद हारून हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. नियाज कुरेशी,मौलवी मजिद, डॉ., नसरीन मवानी,सामाजिक समता संघर्ष समितीचे मोहम्मद इरफान शेख आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची कॅच द रेन मोहीम
यावेळी ऑल इंडिया इत्तेहादे मुस्लेमीन,खवातिने इस्लाम चे अध्यक्ष शाहीन शेख, माँ फातिमा बहुउदेशशिय संस्था चे अध्यक्ष मुन्नी मुमताज शेख, हारमोनी कॉम्मुनिटी सर्व्हिस चंद्रपूर, सहारा बहुउदेशशिय संस्था चंद्रपूर चे अध्यक्ष शिरीन शेख, मिहान बहुउदेशशिय संस्था चंद्रपूर अध्यक्ष परवीन सय्यद, शिफा बहुउदेशशिय संस्थेच्या अध्यक्ष कौसर खान आदी याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रुस्तम खान,आमीन खान, अय्युब शेख, झाकीर शेख, शरीफ खान, इमरान खान आदींनी अथक परिश्रम घेतले.