News34 chandrapur
गोंडपीपरी :– तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल लगतच्या जंगलातील गार्डन मध्ये पालकांच्या विनापरवाणगीने नेण्यात आली मात्र जेवणातून 12 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून त्या विद्यार्थ्याना ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे भरती करण्यात आले आहे. Food poisoning
चेक बोरगाव येथिल जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल लगत असलेल्या खराळपेठ जंगलाच्या गार्डन मध्ये नेण्यात आली.सोबतच चिकनाचे स्नेहभोजन करण्यात आले , मात्र सहली करिता एकाही पालकांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, शासकीय नियमाप्रमाणे सहलीच्या पूर्वी शाळाव्यवस्थापन समितीचा ठराव घेणे बंधनकारक असून शिक्षणाधिकारी यांचीही परवानगी घेणे बंधनकारक असताना कार्यरत शिक्षकाने असे काहीही केलेले नाही असे पालकांचे म्हणणे आहे. Chandrapur zilla parishad school
येथे एक ते चार वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत व एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहली करिता हजेरी लावली,त्यात एक 22 वर्षीय गावातीलच मुलगा संजय बक्षी याला मदतीकरिता शिक्षकाने सोबत घेतले होते अशा एकूण 12 जणांना विषबाधा झाली असून त्यांना उपचारार्थ गोंडीपीपरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यात भारती आत्राम, श्रावणी शेंडे,टिना बोरकुटे, खुशाल बोरकुटे, सतीश वेलादी, रुद्रमनी वेलादी,क्रीश वेलादी,आदित्य वेलादी, संस्कार झाडे,पारस झाडे आणि सुमेध बक्षी सह एका विद्यार्थ्यांचा समावेश असून विषबाधा झालेले विद्यार्थी 9 व्या वर्गातील आहे.
सहलीमध्ये एकूण 52 विद्यार्थी दोन शिक्षक आणि इतरत्र तीन अशी एकूण 57 जणांनी जेवणाचा आस्वाद घेतला मात्र त्यापैकी अकरा जनांनाच विषबाधा झाली कशी हाही प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहे, या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक रमेश पेंदोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले चौकशीचे आदेश
: गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे 52 विद्यार्थी खराळपेठ येथे सहलीला गेले होते. जेवण करून सायंकाळी घरी आल्यानंतर 12 मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे भरती करण्यात आले. भरती असलेल्या सर्वांची तब्येत बरी आहे. तर इतर मुले आपापल्या घरी व्यवस्थित असले तरी त्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे.
