News34 chandrapur
ब्रह्मपुरी - ब्रम्हपुरी मतदासंघांसह जिल्हयातील इतर तालुक्यातही हिंस्त्र प्राण्यांनी उन्माद घालत हल्ले चढवून ठार करण्याच्या घटना दररोज घडत आहे. अशातच सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात असून वन विभाग प्रशासने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न बघता तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते ,आ. विजय वडेट्टीवार यांनी आज सावली येथे वनाधिकाऱ्यांसमवेत आयोजित विशेष बैठकीत दिले. Tiger attack
आयोजित बैठकीस मुख्य वनसंरक्षक लोणकर, विभागीय वनाधिकारी खाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष संदिप गड्डमवार, माजी जि. प. सभापति दिनेश चिटनुरवार , वनपरिक्षेत्र अधिकारी विरुटकर, नायब तहसीलदार कांबळे, माजी प. स. सभापति विजय कोरेवार, सावली नगराध्यक्षा लता लाकडे,सावली काँग्रेस ता. अध्यक्ष नितिन गोहणे, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, युवक अध्यक्ष आशिष मनबत्तुलवार, व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वन विभाग कर्मचारी, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव वन्यजीव संघर्ष यावर माझी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात वाघांची संख्या किती..? असा सवाल विचारतात वनाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. वाघांची वाढती संख्या व दैनंदिन होणारे हल्ले यामध्ये जात असलेल्यांना बळींबाबत चिंता व्यक्त करीत माजी मंत्री वडेट्टीवारांनी वनाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. दिवसागणिक वाढत असलेल्या वाघांच्या संख्येत भर पडत असताना वनविभाग अनभिज्ञ कसा? असा सवाल त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. क्षेत्रातील जनता यांच्या जीवाचे रक्षण करणे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य असून जिल्ह्यातील संपूर्ण वाघाची मोजणी करून आरक्षित क्षेत्र मर्यादेपेक्षा अधिक वाघांची स्थलांतर करावे व वन व्याप्त क्षेत्राला जाळीचे कंपाऊंड, गावातील पर्यंत सोलर लाईट बसविणे, गावातील वीस तरुणांना कामावर घेऊन एक चमु गठीत करून रात्रपाळी गस्त सुरू करणे, तसेच गावातील गुराखी, शेतकरी, शेतमजुरी यांना स्वसंरक्षणासाठी करंट काठी, मुखवटे आदिसह वनातून शेतीकडे जाणारा पायवाट मार्ग वृद्ध व परिसरातील गवत झुडपे कापून सफाई करणे, गावाला जात आहे असलेल्या झुडपांची सफाई करणे, नादी उपायोजना तातडीने करण्याचे निर्देश माजी मंत्री वडेट्टीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिले. Human Wildlife Conflict in chandrapur
तसेच वनलगत ग्राम खेड्यांसाठी उपलब्ध प्रमाणात निधी उपलब्ध करून नागरिकांचे संरक्षणासाठी विविध उपाययोजना करावी व वन्य प्राण्यांकडून होत असलेली शेतमिकांची नासधुस याचा योग्य पंचनामा करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी. जनतेच्या जीवनाचे मोल समजून घेऊन वनविभागाने हिंस्त्र पशू हल्ल्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न बघता कठोर पावले उचलावी अन्यथा वन्यजीव हल्ल्यात बळी पडलेल्या मृदा देहाला घेऊन चक्क वन विभाग कार्यालयात आंदोलन करणार असा इशाराही माजी मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी वनाधिकाऱ्यांना दिला.