News 34 chandrapur
चंद्रपूर/गडचांदूर - 13 जुलै ला विरुर पोलिसांनी पुरात अडकलेल्या 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले होते, तर 14 जुलै च्या मध्यरात्री 2 वाजता गडचांदूर पोलिसांनी 2 दिवसापासून पुरात अडकलेल्या 22 वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले.चंद्रपूर पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे, अनेक अडचणींचा सामना करीत पोलीस बचाव कार्य पार पाडत आहे. Maharashtra rains
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे, इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले आहे, आता गोसेखुर्द धरणाचे सुद्धा काही दरवाजे उघडले असून चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा धोका वाढला आहे. Chandrapur flood
गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ 2 दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते, वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकले नाही.
पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्याला अडथळा निर्माण होत होता. Heavy rains
अखेर मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी सर्व वाहनचालकांना बाहेर काढण्याचा निर्धार करीत मुसळधार पावसात बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरले व पाळीने सर्व वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढले.
वाहनचालकात 6 स्थानीय तर 16 बाहेर राज्यातील होते, माल अनलोड केल्यावर आम्ही 2 दिवस कुठेही मुक्काम करतो मात्र सध्या पावसात आम्हाला याबाबत काही अंदाज आला नाही, पोलीस प्रशासन जर वेळेत पोहचले नसते तर आम्ही आज सुखरूप बाहेर आलो नसतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी देत पोलिसांचे आभार मानले. Chandrapur police जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बचाव कार्य यशस्वीपणे पार पाडणाऱ्यात बोट चालक पो.हवा. अशोक गरगेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, गिरीश मरापे, दिलीप चौहान, अजित बाहे, सुजित मोगरे व अतुल चहारे यांचा समावेश होता.
गडचांदूर पोलिसांनी सर्व वाहनचालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. Cmo maharashtra