News34 Chandrapur
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, Commercial, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी ४५५ कोटी ९४ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.
चालू आर्थिक वर्ष ३१ मार्च ला संपणार.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १५ कोटी ४ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक गाहकांकडुन ३ कोटी १८ लाख येणे आहे. औदयोगिक ग्राहकांकडुन ४कोटी ३१ लाख थकबाकी वसुली येणे आहे. कृषिपंधारकांडून २१८ कोटी ९० लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ४ कोटी ४३ लाख तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०७ कोटी ६८ लाख येणे आहेत. यासंदर्भात भ्रमणध्वणी संदेषवजा तसेच छापिल नोटीशी देण्यात आल्या आहेत. नोटीशी देवून आता नोटीशीची मुदतही संपली आहे.
तर कृषिग्राहकांसाठी राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार कृषिपंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी महिनाभर राहिला असून थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व पूर्ण चालू वीजबिल येत्या ३१ मार्चपर्यंतच भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे.
थकबाकी वसुली करिता कठोर पाऊले उचलत महावितरण Msedcl द्वारा थकबाकीदार,घरगुती ग्राहकांसोबतच पाणीपुरवठा योजना, पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वीजपुरवठा Power supply खंडीत झाल्यास सामान्य जनेतेची असुविधा थकबाकी न भरल्या गेल्यामुळे ओढावणार आहे.
महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वुसलीतून प्राप्त पैश्यामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागते. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व त्यांना वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते. वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात. ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत दि. ८ फेब्रुवारी महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवरच्या या सर्वाधिक मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने वीजपुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. महावितरण ग्राहकांची काळजी घेत विविध पायाभूत कामे करुन त्यांना प्रसंगी खुल्या बाजारातून वीज खरेदी करुन वीजपुरवठा करते. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार. तेव्हा सुजान ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे हे कळकळीचे निवेदन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे केले आहे.
