चंद्रपूर - भारताला १९४७ साली देशाला जे स्वतंत्र मिळाले ते भीक मिळालेलं स्वतंत्र आहे. भारताला खरे स्वतंत्र २०१४ ला मिळाले असे Traitor देशद्रोही वक्त्यव्य सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने केले. स्वातंत्र्यलढ्यात हजारो स्वतंत्र सैनिक हुतात्मे झाले. अनेक महापुरुषांचा हा अवमान आहे. प्रसिद्ध वकील फरहात बेग यांच्याशी विचारविमर्श करून सिनेअभिनेत्री kangana ranaut कंगना राणावत विरुद्ध खासदार बाळू धानोरकर यांनी लेखी तक्रार रामनगर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली. यावेळी इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, एनएसयुआय अध्यक्ष यश दत्तात्रय, एनएसयूआय विधानसभा अध्यक्ष कृष्णा रेड्डी, मनोज खांडेकर, रवी दुर्गे, आलोक चवरे, अश्रफ खान यांची उपस्थिती होती.
भारताला स्वतंत्र मिळावे यासाठी मोठा संघर्षपूर्ण व दीर्घ लढा द्यावा लागला आहे. ब्रिटिशांच्या जुलमी, अत्याचार राजवटीला भारतातून हाकलून लावून देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी आपले बलिदान दिले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, शहीद भगतसिंग यांच्यासारख्या अनेकांचे योगदान या स्वातंत्र लढ्यासाठी राहिले आहे.
ब्रिटिश सत्तेला 'चले जावं' म्हणत छातीवर शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी गोळ्या झेल्या, आपले प्राण दिले पण स्वातंत्र्यासाठी ते मागे झटले नाहीत. या सर्वांच्या त्यागामुळे, बलिदानामुळे आपल्याला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर पंडित नेहरूजी यांच्या नेतृत्वाखाली व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला आपल्या संविधानामुळे भारत जगात एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे. परंतु अभिनेत्री कंगना राणावतसारख्या काही अविचारी, बेताल व्यक्तीने स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला आहे. अशा व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करणे हा पुरस्काराचाही अपमान आहे. त्यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
