प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील संपूर्ण आदिवासी असलेल्या काटवन येथे महाराजस्व अभियान Maharajaswa Abhiyan कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाराजस्व अभियानामुळे रेंगाळलेली कामे त्वरित मार्गी लागणार असे मार्गदर्शन तहसीलदार डाॅ.रविंन्द्र होळी शेतक-यांना शेतकऱ्यांना केले.
महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम,गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘कोरोना संपल्या बरोबर मुल तालुक्यातील काटवन येथे पहिला ‘महाराजस्व अभियान‘ राबविले जात आहे. सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे यामुळे मार्गी लागत आहेत, असे प्रतिपादन तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांनी काटवन येथे बोलतांना केले.
मूल येथे महाराजस्व अभियानंातर्गत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे वेळी केले.
यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा परीषद अध्यक्षा सौ.संध्याताई गुरूनुले,तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी, नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर,समिती सदस्य,तुषार तनपुरे पुरवठा निरीक्षक,पुरूशोत्तम बनकर कनीष्ठ लीपीक,महसूल विभागातील उईके साहेब, बेलसुरे साहेब, श्रावणबाळ,संजय गांधी योजनाचे गिरडकर बाबूची, निवडणूक विभागातील करपे बाबूजी तलाठी कार्यालयातील कर्मचारी,मंडळ अधिकारी खोब्रागडे, बावणे,मनोज वलादे उपस्थित होते.
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून गावातील नागरीकांचे सातबारावरील अचूक नोंदी,साताबरावरील हिस्सेवाटूनी कागदपत्राच्या माध्यमातून करून देण्यात आले.
यावेळी महसूल विभागातील रेशन कार्डची प्रकरणे , उत्पन्न दाखले,नाॅनक्रिमीलेअर प्रमाणपत्र,संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच सौ.वंदना राजेंन्द्र पेंन्दोर, रजन विशेश्वर सिडाम उपसरपंच, सुरज आकनपल्लीवार सचिव,गजानन आलाम, संदिप मोहूर्ले, वासुदेव कुळमेथे,माजी पोलीस पाटील,मोहन किन्नाके पोलीस पाटील, रघुनाथ पांडूरंग मंगाम, प्रगती महिला बचत गट मारोडा, सौ.रूखमाबाई मानकर,स्वाती ताई पुनकटवार, प्रेमिला मानकर, पुप्पाताई मडावी,रमाबाई महिला बचत गट मारोडा, संगिता निमगडे,जास्कंदा गेडाम, मंगरू कुळमेथे, बयाबाई कुळमेथे, सितकुरा, गेडाम, संजय गेडाम,वंसत सोयाम,नारायण सोयाम,रजत सिडाम, तुळशिरामजी कुळमेथे, गावातील नागरीक,विद्यार्थी उपस्थित होते.
