चंद्रपूर : शेतकऱ्यांचे अनेक वेळा अतिवृष्टीमुळे तर कधी कोरड्या दुष्काळा मुळे पिकांचे नुकसान होते. कधी लष्करी अळी तर कधी कोणत्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हाती असलेले पीक हिरावले जाते. कर्ज काढून शेती करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी कर्जबारीपणामुळे आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यामुळे शेती कौशल्य असलेल्या हजारो शेतकऱ्यांना आपण गमावले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी जिल्हा स्तरावर मायनस ग्रॅन्ड निधी उपलब्ध करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. Cm thakrey
शेतकरी आत्महत्येसह farmer suicide ग्रामीण भागात अनेक वेळा वीज पडून अथवा विजेच्या स्पर्श लागून मृत्यू होणे, शेतातील पिकांचे पुंजने जळून वित्तहानी होणे, रासायनिक खते, ताडपत्री आगीच्या विळख्यात सापडणे अशा घटना अनेक वेळा घडत असतात. याकरिता तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासाठी हतबल झालेल्या बळीराजाला त्यांच्या कुटुंबियांना प्रदीर्घ शासकीय प्रक्रियेत न भरडता आर्थिक मदत मिळण्याची पद्धत २०१४ पूर्वी सुरु होती, परंतु मध्यतंरी भाजप सरकारच्या राजवटीत बंद झाल्याने पूर्ववत अर्थसहाय्याची तरतूद करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर mp balu dhanorkar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.