प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल-सावली या दोन्ही तालुक्यातील धानाची रोवणी होऊन निंदनाचेही काम पूर्ण होत आहेत. धान पीक आता गर्भात येण्याची वेळ येत आहे परंतु जस-जसे पीक वाढायला लागले तसे रानटी डुकरांचा हैदोस सुद्धा वाढत जात आहे. धान पिकासोबत दोन्ही तालुक्यातील शेतकरी यानी पाळीवर तूर , तिळ, वाल, आणि पोपट पिकाची लागवड केलेली आहे या पिकांची झाडे मोठी झाली असून तिळ पिकाला बंड्या यायला सुरुवात झाकी असतांना रानटी डुकरे ह्या पिकांची नासधूस करीत आहेत त्यामुळे मोठया प्रमाणात हाती येणाऱ्या मालाची अतोनात नुकसान होत आहे. यासाठी दोन्ही तालुक्यातील वनविभागाने आपले रानटी डुकरे आपल्या जंगलात बंदीस्थ करून ठेवावे अशी मागणी असंख्य शेतकरी बांधवांनी केली आहे . बिचारा बळीराजा शेतकरी मोठ्या मेहनतीने कष्टाने धान, कापूस, तूर,तीळ, सोबत पोपट,वॉल, याची महागडी बिजाई घेऊन लावणी केली आहे. धान व कापूस पिकाला येणारा खर्च शेतकऱ्याला परवडणारे नाही म्हणून काही प्रमाणात बियाणे व रोवणी,निंदणी करण्याचा काही खर्च निघू शकते या हेतूने तूर, तिळ, पोपट, वॉल असे अंतर्गत पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. Wild boarपरंतु रानटी डुकरांचा कळप शेतात यायला लागला असून डुकरांच्या भीतीमुळे शेतकरी बांधव ,शेतकऱ्यांची पत्नी,मुले,शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. एकीकडे वन्यप्राण्यांची भीती तर दुसरीकडे हाती येणाऱ्या पिकांची नासाडी आशा संकटात शेतकरी सापडला आहे. बळीराजा शेतकरी बांधव शेतात लावलेल्या पिकाचे पालन करते तर शासनाचा वनविभाग रानटी डुकराचे पालन करते. अशा अवस्थेत शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसानीला जबाबदार कोण ,असा प्रश्न शेतकरी बांधव करीत आहे. ज्या पद्धतीने आमचे पाळीव जनावरे बैल,गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांची जोपासना आम्हीच करतो त्याच प्रमाणे वनविभागाने आपल्या डुकरांचा बंदोबस्त वनविभागानेच करावा अन्यथा आपल्या जंगल एरियाला चौफेर तारांचा कुंपण करुन रानटी डुकरांचा बंदोबस्थ आपणच करावा अशी मागणी मुल-सावली तालुक्यातील असंख्य नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनि केली आहे. मागील वर्षी याच शेतकऱ्यांनि धान पीक निघाल्यावर खरीप पिकामध्ये, तूर, चना, लाकेचे उत्पन्न लावले होते परंतु ही सर्व पिके फळांवर आल्यानंतर,तुरीला शेगा, लाकेला, शेंगा लागल्यावर याच रानटी डुकराच्या हैदोषाने संपूर्ण पिकच नष्ट केले होते. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून वनविभागाकडे लेखी अर्ज केला होता त्यानुसार वन विभागाकडून मोका चौकशी सुद्धा करण्यात आली होती परंतु एक वर्षाचा कालावधी होत आहे तरी देखील नुकसान झालेल्या व विनंती अर्ज केलेल्या शेतकरी बाधवांना कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. याबाबत जिल्ह्याच्या नाम.पालक मंत्र्यांनी आणि मान. जिल्हाधिकारी यांनी व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चौकशी नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी अशी मागणी वजा विनंती केली आहे.