या बैठकीला महावितरणचे मुख्य अभियंता देशपांडे, अधिक्षक अभियंता चिवंडे मॅडम, कार्यकारी अभियंता फरासखानवाले, उपकार्यकारी अभियंता तेलंग, चौरसीया उपस्थित होते. अनेक ग्राम पंचायतींच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी ग्राम पंचायतच्या पथ दिव्यांचे बिल जुन्या पध्दतीने जिल्हा परिषदनेच भरावे अशी मागणी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. त्याच प्रमाणे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना कनेक्शन न कापण्याबद्दल चर्चा केली. या दोन्ही मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बरोबर सुध्दा आ. मुनगंटीवार यांनी चर्चा केली.
बैठकीत ठरल्याप्रमाणे कुठल्याही ग्राम पंचायतचे पथ दिव्यांचे कनेक्शन कापणार नाही, पुढील तीन दिवसात कापलेले सर्व कनेक्शन पुर्ववत जोडण्यात यावे हे विज वितरण कंपनीच्या अधिका-यांनी मान्य केले. आ. मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना या संदर्भात जिल्हाधिका-यांशी संपर्क करुन पुढील सात दिवसात बैठक लावण्याचे निर्देश दिले. अशा प्रकारचे धोरण महाराष्ट्रातील अन्य जिल्हयात राबविले जात आहे का? याची चौकशी करण्याची निर्देशही आ. मुनगंटीवार यांनी विज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिले व त्याची माहीती मला द्यावी असेही निर्देश दिले.
