प्रतिनिधी/गुरु गुरनुले
मुल- बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून, या क्षेत्राचा कायापालट झाला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिस्कुटी गावाचा चेहरामोहरा बदलविला जाईल.
हे सर्वांग सुंदर, स्वच्छ दिसावे, यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले.
मूल तालुक्यातील फिस्कुटी गावात विविध विकासकामांचे भूमीपुजन संध्या गुरनुले यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपस्थित डाँ. मयूर कळसे गट विकास अधिकारी पंचायत समिती मुल, श्री. गोंगले उप विभागीय अभियंता मूल, श्री. बोरलावार अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, श्री. नितीन गुरनुले सरपंच ग्राम पंचायत फिस्कुटी, श्री. बंडू नर्मलवार सरपंच ग्राम पंचायत उश्राला, श्री, संजय येनूरकर सरपंच ग्राम पंचायत गडीसुरला, श्री प्रशांत बाम्बोडे भारतीय जनता पार्टी चे प्रमुख कार्यकर्ता, श्री. राकेश गिरडकर उपसरपंच ग्राम पंचायत फिस्कुटी,श्री. चंदू नांमपल्लीवर राजोली, श्री. राजू पोटे, श्री. दांडेकर ग्रामसेवक फीस्कुटी, श्री. सतीश कावळे सदस्य, श्री. पुरुषोत्तम वाढई पोलिस पाटील, श्री. सुधीर मोहूर्ले, श्री. नितीन कदाम, ग्राम पंचायत सदस्य सतिश कावळे, सौ. पपीता मांदाळे, सौ.प्रेमीला शेंडे, सौ.रेखा चौधरी, सौ. भावना मोहुर्ले, श्री. नवनाथ गुरनुले, आदींची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी भोई समाजासाठी सभागृहाचे बांधकामाचे भूमीपुजन भूमीगत गटारे बांधकाम, गुजरी चौकात चावडी बांधकाम, विहिरीवर इलेक्ट्रीक मोटारपंप, पाण्याची टाकी, नळयोजना पुरविणे, सोलर वॉटर हिटर, सोलर सिस्टिम आदींसह अन्य 3 कोटींच्या विकासकामांचे भूमीपुजन पार पडले. News34
ही कामे आमदार निधी, जिल्हा निधी, जनसुविधा व अन्य योजनेतून मंजूर करण्यात आली आहेत. ही कामे त्वरीत पूर्ण होऊन ग्रामस्थांच्या सेवेत रूजू होतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे, मागील सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामस्थांना विविध विकासकामांचे आश्वासन दिले होते.
त्या आश्वासनाची पूर्तता संध्या गुरनुले यांनी अल्पावधीत केल्याने ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत केल्या गेले. दरम्यान, याप्रसंगी गावातील 60 वृद्धांना आधारासाठी काठ्याचे वितरण करण्यात आले.
गावांच्या विकासासाठी जिल्हा परिषद व शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. त्या योजना खेचून आणत गावांच्या सर्वागिण विकासाला आपले प्राध्यान्य राहील. या गावातील नागरिकांनाही विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नरत राहीन, असेही त्या म्हणाल्या. news34 chandrapur
या गावातील पथदिव्यांचे वीज देयकाचा भार कमी करण्यासाठी सोलर सिस्टिम बसविली जात आहे. तर नागरिकांना शुद्ध व गरम पाणी मिळावे, यासाठी सोलर वॉटर हिटर बसविण्यात आले आहे. यातून ग्राम पंचायतींच्या निधीची बचत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
