चिमूर:- चिमूर मुख्यालयापासुन अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगांव-काग प्रभागातील उमा नदीच्या पात्रातुन रेतीचा अवाढव्य उपसा करण्यात येत आहे, मागील तीन महिन्यापासून रेतीची चोरटी वाहतूक बेधडक होत असताना सुद्धा याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने महसूल विभागाचे अधिकारी यात सामिल आहे की काय असा सशय बळावला आहे,
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे, वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनतेवर कठोर निर्बंध लादन्यात आले आहे, पन रेती तस्करानी लॉकडाऊनला न जुमानता रेती तस्करानी गोरखधंदा सुरु केला आहे, सध्या या तस्करानी सोनेगांव-काग उमा नदिवरिल रेती वर हल्लाबोल केला असून रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे, या अवैध वाहतूकिमुळे पांदन रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे.
रेती कार्यवाही टाळन्यासाठी रेती घाट ते चिमूर तहसील मुख्यालय पर्यन्त खबरे ठेवले आहे, तीन ते चार दिवसा आधी शिवसेना पदाधिकारी यानी रेती घाटावर धड़क दिली असता मजूर व ट्रक्टर असता व्यस्त करीत पळत होते, त्यानंतर रेती तसकरिला ब्रेक लागला होता पन महसूल प्रशासन कोनतीच कार्यवाही करत नसल्यामुळे तस्कारांची मुजोरी पुन्हा पाहायला मिळत आहे, चिमूर तालुका शिवसेनेच्या वतीने दोन तीन वेळा रेती घाटावर धाड़ टाकून उपविभागय अधिकारी, तहसीलदार याना फोन वरुण महितिसुधा देण्यात आली, पन रेती तस्करावर प्रशासनाचा हात असल्यामुळे कोणतीच कार्यवाही झाली नसून प्रशासनाचे आशीर्वादाने रेती तस्कर बिनधास्त रेती उत्तखनंन करीत आहेत, आतापर्यंत शासनानाचा करोड़ो रूपयाचा महसुल बुडाला असून महसूल विभागाने वेळीच मुस्कया आवरल्या नाही तर शासनाचा करोड़ो रूपयाचा महसूल बुडल्या शिवाय राहनार नाही, रेति तस्कर एवढ्या प्रमाणात रेती चोरी करीत असताना प्रशासन गप्प का, महसूल विभागाचे किती अधिकारी यात सामिल असतील याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे,
