गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील खिर्डी येथील कृष्णदेव रामदास पिपरे यांच्या दोन बैलाने शेतातील विषारी औषध पिल्याने एकापाठोपाठ दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. सदर घटना १२ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.धामणगाव शिवेतील एका शेतात पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या विषारी औषधाचे द्रावण करून ठेवले होते.हे द्रावण पिल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याचा आरोप बैल जोडी मालक कृष्णदेव पिपरे यांनी केला आहे.
बैलांच्या मृत्यूमुळे ऐन संकटाच्या काळात जवळपास दीड लाखांचे नुकसान झाल्याची खंत पिपरे यांनी व्यक्त केली आहे.शासनाकडून मदतीची मागणी केली आहे.दरम्यान याच शेतात ११ एप्रिलला धामणगाव येथील देवराव कातले ज्यांच्या जनावराला विद्युत करंट लागल्याने मृत्यू झाला.सलग दुसऱ्या दिवशी अशी घटना घडल्याने सदर शेती मालकावर कारवाई करण्याची मागणी बैलजोडी मालक पिपरे यांनी केली आहे.
-----------//--------
"त्या शेतकऱ्यावर कारवाई करावी"
शेतात विषारी द्रव्य किंवा विद्युत करंट लावून ठेवणे हे मुक्या जनावरांसाठी घातक असून कोणतेही जनावर केव्हाही शेतात येऊ शकते.त्यामुळे ही पद्धत मुक्या जनावरांसह शेतकऱ्यांसाठी सुद्धा घातक आहे.अशा पद्धतीने अमानवी कृत्य करणाऱ्या त्या शेतकऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असून दोन्ही बैल मृत्युमुखी पडल्याने शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
बैलजोडी मालक "कृष्णदेव पिपरे खिर्डी"
----------//--------