चंद्रपूर - देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असतांना चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी हरविलेले आहे, या भयावह काळात जनतेच्या आरोग्याच्या समस्येवर लक्ष द्यायचं सोडून राजकारण करण्यात व्यस्त आहे.
राज्यात एकमेव कांग्रेस खासदार बाळू धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्यातून निवडून आले मात्र आता कोरोना काळात नागरिकांना बेड, प्राणवायू, रेमडीसीविर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतांना खासदार धानोरकर हे कुटुंबियांसोबत बंगळूर येथे आयोजित राजभाषा संसदीय समितीच्या बैठकीला गेले.
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या मृत्यूदरात वाढ होत आहे, मात्र खासदार साहेब जिल्ह्यात उपलब्धच नाही, त्यांनी काही दिवसांपूर्वी विद्युत शवदहिणीची मागणी केली होती, जे मृत्यूशी झुंज देत आहे त्यांची काळजी न करता मृतदेहाबाबत खासदार साहेबांना जास्त चिंता आहे.
राज्याचे आपत्ती व मदत निवारण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार सुद्धा आठवड्यातून एकदा चंद्रपुरात दाखल होतात मात्र तोकडी आरोग्य व्यवस्था, बेड ची संख्या याबाबत नियोजन शून्य काम करून जातात.
बैठक घेत प्रशासनाला निर्देश दिल्या जाते मात्र त्यानंतर काय होत याचा पाठपुरावा सुद्धा नाही.
महिला रुग्णालयात प्राणवायूचा प्लांट उभारला मात्र त्याला अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही, म्हणून ऑक्सिजन युक्त बेड अजूनही तसेच पडले आहे.
काही दिवसांपूर्वी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी ऑक्सिजन युक्त बेडचे उदघाटन केले पण ते सुरू झाले नाही, खुद्द त्यांच्या विधानसभा क्षेत्रात रुग्णाला बेड मिळाला नाही म्हणून त्याने प्रवासी निवऱ्यात आपले प्राण त्यागले.
19 एप्रिलला चंद्रपुरात रुग्णाला बेड मिळाला नाही म्हणून त्याने आपल्या वाहनात जीव सोडला, चंद्रपूर जिल्ह्यात वाढणारी बाधितांची संख्या व त्यावर प्रशासनाचे नियोजन आधीच व्हायला हवे होते कारण कोरोना विषाणू हा 2020 मध्येच आला होता, वर्षभरात आपण शासकीय आरोग्य व्यवस्था व्यवस्थित करू शकला असता मात्र तसे काही झाले नाही.
ज्यावेळेस नागरिक कोरोनाने मृत्युमुखी पडत आहे नेमकं तेव्हाच यंत्रणा हलवायची हे कसले पालकत्व आहे.
आमदार जोरगेवार यांनी सुद्धा 30 बेड सुरू केले अशी ओरड केली मात्र ते बेड अजूनही सुरू झालेच नाही यावरून जनप्रतिनिधी यांची तत्परता काय हे दिसूनच येते.
सध्या जिल्हा प्रशासनासोबत जनप्रतिनिधी पूर्णपणे कोरोनाकाळात फेल झाले आहे.
मनपा स्वतःचे कोविड सेंटर उभारू शकले नाही, शहरात अवाढव्य कर लावण्यात मनपाला रस आहे मात्र नागरिकांच्या आरोग्याची चिंता मुळीच नाही.
समाजमाध्यमांवर जिल्ह्यातील सर्व जनप्रतिनिधींवर सडकून टीका होत आहे कारण त्यांची निष्क्रियता कोरोना विषाणूने जनतेच्याया समोर आणली.
ही वेळ राजकारण करायची नसून एकत्र येत कोरोना पासून नागरिकांचे रक्षण करण्याची आहे, मात्र आज सर्व जनप्रतिनिधी वेगवेगळ्या दिशेने धावत आहे. सध्या माजी खासदार हंसराज अहिर एकमात्र असे प्रतिनिधी आहे की ज्यांनी या कोरोना काळात नागरिकांना योग्य आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी प्रशासनाला धारेवर धरून आहे.
माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर समाज माध्यमातून सडकून टीका होत आहे, जिल्ह्यात उद्यान बांधण्यापेक्षा निदान एक चांगल हॉस्पिटल निर्माण केलं असत तर आज ही परिस्थिती नागरिकांवर ओढवली नसती.
सध्या मुनगंटीवार हे बल्लारपूर सह चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात ठाण मांडून बसले आहे.
विशेष म्हणजे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, मनसे, बसपा प्रशासनाला जाब विचारायची हिम्मत का करीत नाही? हा गंभीर प्रश्न आहे.
पत्रकारिता ही निष्पक्षपाती आणि चाटुगिरी विरहित असावी. तथाकथित विकासपुरुषांनी सिमेंट चे आणि बाबूंचे सांगाडे बांधून ठेवले आहे, त्यांच्यावर पण प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे, किंवा एकच लक्ष 33 कोटी वृक्ष लागवडी मुळे जिल्ह्यातील जनतेला कसा ऑक्सिजन पुरवठा झाला आहे ह्या बद्दल तरी गोडवे गावेत. सामान्य नागरिकांना रेमडेसिवर इंजेक्शन न मिळता स्वतः जवळच्या उचभ्रू लोकांनाच कसे मिळवून दिले याबद्दल पण पोवाडे गावावे.
उत्तर द्याहटवाह्या वरून असे निष्पन्न होते की जिल्ह्यात फक्त 3च जण प्रतिनिधी आहे, आणि बाकीचे उंटावरून शेळ्या हाकणारे आहे.
आपले राजकारण हे स्वार्थाने प्रेरीत आहे.जनलोकभावनांची कदर केली जात नाही.कारण आम्ही मतं खरेदी करून निवडून येत असतो.हे सर्वज्ञात आहे.मग नागरिक मेले काय जगले काय ? कुणालाच काही सोयरसुतक नाही.संकटकाळात मृतांच्या टाळूवरचे लोणी
उत्तर द्याहटवाखाणा-यांची संख्या काही कमी नाही.