चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील गोंडकालिन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव अतिक्रमनाने गिळकृत होत आहे, तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे, त्यामुळे रामाळा तलाव प्रदूषण मुक्त करण्यासाठी इको-प्रो च्या वतीने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. #News34
सदर आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन मनसे चा पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार,महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता ताई गायकवाड, जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगूलवार,महिला जिल्हा सचिव अर्चना ताईआमटे, शहर उपाध्यक्ष महेश शास्त्रकार, शहर सचिव फिरोज शेख, शैलेश सादलावर इत्यादींची उपस्थिती होती.
