चंद्रपूर - केंद्र सरकारने शेतकरी विरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे मागे घ्यावेत व आधार भावाला कायदेशीर संरक्षण द्यावे या मागण्यांसाठी दिल्ली येथे दोन महिन्यापेक्षा अधिक काळ सुरू आलेले शांततापूर्ण आंदोलन कुटीलपणे बदनाम करून मोडून काढण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. पण सरकारच्या या कारस्थानास शेतकऱ्यांचा जबरदस्त प्रतिकार होत आहे.
शेतकरी बांधव यांच्या आंदोलन स्थळी असलेल्या मूलभूत सेवा जसे पाणी, विज, शौचालय व्यवस्था, बन्द करण्याच्या केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला तसेच सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी आंदोलन मोडीत काढण्यासाठी हिंस्र व कुटील मार्गाचा अवलंब केला आहे, या हिंसक कृती च्या विरोधात सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये उपोषण, उपवास, निषेध करण्यात येत आहे या अनुषंगाने चंद्रपुर मध्ये महात्मा गांधी चौक मनपा समोर धरने आंदोलन करण्यात आले.
आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर केंद्रातील भाजपा सरकारच्या हिंसक कृतीचा जाहीर धिक्कार करत आहे. #News34
आंदोलन स्थळी उपस्थित प्रशांत येरने (महानगर अध्यक्ष), सुनील मूसळे (जिल्हाध्यक्ष ग्रामीण), परमजीत सिंघ (जिल्हा संघटन मंत्री), सुनील भोयर (संघटन मंत्री महानगर), संतोष दोरखंडे (जिल्हा सचिव), राजू कूड़े ( सचिव महानगर), शंकर धुमाले (ऑटो संघटन जिल्हाध्यक्ष), योगेश आपटे (शहर उपाध्यक्ष), सिकन्दर सागोरे (शहर उपाध्यक्ष), भिवराज सोनी, अशोक आनंदे, अजय डुकरे, शाहरुख शेख, रामदास पोटे, वामनराव नन्दूरकर , सय्यद अली, आसिफ हुसैन, रवि पुपलवार, इर्शाद शेख, श्रीमती. वैशाली डोंगरे, सन्दीप तुरकयाल, सुरेंद्र करकाडे, एस बी चौहान, हिमाऊ अली, मनीष नागपुरे, मारोती धकाते, मयूर राइकवार, बबन क्रिश्नपल्लिवार, दिलीप तेलंग, राजेश चेडगुलवार (जिल्हा, महानगर सोशल मीडिया हेड) आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.
