News34 chandrapur
चंद्रपूर - गोर गरीब जनतेला रास्त भावात धान्य मिळावे यासाठी शासन विविध योजनेच्या माध्यमातून नागरिकांना धान्य उपलब्ध करीत आहे मात्र त्या योजनेचा रास्तभाव दुकान चालक गैरवापर करीत असल्याचा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे.
Black market of grain in Chandrapur
नगिनाबाग येथील रास्तभाव दुकान चालक चंदू बगले यांनी गोर गरिबांना धान्य न देता ते बिगर रेशन धारकांना विकल्याची बाब उघडकीस आली आहे.
सदर बाब अन्न पुरवठा निरीक्षक भारत तुमडे यांच्या लक्षात आली, 21 मार्चला नियमित रास्तभाव दुकानाला पुरवठा निरीक्षक तुमडे यांनी भेट देत डिसेंम्बर 22 ते मार्च 23 या कालावधीत बगले यांच्या दुकानाला प्राप्त धान्याचा साठा किती आहे याबाबत तपासणी केली असता साठा रजिस्टर व ई-पोस मशीन मध्ये मोठी तफावत आढळली.
Sale of grain at higher prices
साठा व विक्री रजिस्टर तपासले असता त्यामध्ये तब्बल 23 क्विंटल ज्यामध्ये गहू, तांदूळ व साखर चा अपहार झाल्याची बाब निदर्शनास आली त्या मालाची एकूण किंमत 89 हजार 438 रुपये आहे.
E-POS machine
ई-पोस मशीन व विक्री रजिस्टर यामध्ये बरीच तफावत आढळून आली, रास्तभाव दुकान चालक चंदू बगले हे नागरिकांच्या आंगठ्याचे ठसे घेतात मात्र त्यांना धान्य देत नाही व शिल्लक धान्य हे वाढीव दरात विकत असल्याचे तुमडे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत बगले विरोधात तक्रार देत त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे धान्याची काळाबाजारी होऊ नये यासाठी शासनाने रास्त भाव दुकानात ई-पोस मशीन दिल्या आहे, त्यामध्ये नागरिकांनी धान्य उचलले की नाही याबाबत अचूक माहिती तहसील कार्यालयाला प्राप्त होते, पण या आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा चंद्रपुरातील रास्त भाव दुकानदार चंदू बगले यांनी चकवा दाखवीत धान्याची काळाबाजारी केली.
त्यांनी मशीन मध्ये नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे घेतले मात्र धान्य वितरित केले नाही, त्यांच्या नावावर असलेला धान्याचा कोटा दुसऱ्यांना जास्त भावात विकला.
पोलिसात तक्रार दाखल झाल्याचे कळताच चंदू बगले हे फरार झाले आहे, सध्या रामनगर पोलीस हे चंदू बगले यांचा शोध घेत असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
याबाबत अन्न पुरवठा निरीक्षक भारत तुमडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बगले यांच्यावर कारवाई करण्यात आली असे सांगत त्यांच्या रास्त भाव दुकानाचा परवाना निलंबित करण्यात यावा यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी भराडी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात कुठेही असे प्रकार आढळल्यास नागरिकांना तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, नागरिकांच्या तक्रारींवर धान्याचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल.