चंद्रपूर - गुरुवार(10 मार्च) ला 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.यात 4 राज्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे स्थानिक गिरनार चौकात भाजपा नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत भव्य विजय जल्लोष करीत साजरा केला.
Bjp Celebrate victory
Bjp Celebrate victory
विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या विजय जल्लोष कार्यक्रमात,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,उपमहापौर राहुल पावडे, महामंत्री रवी गुरनुले,सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे,भाजपा नेते रामपाल सिंग,सुरेश तालेवार,संजय कंचर्लावार,संदीप आवारी,जयश्री जुमडे,खुशबू चौधरी, रवी आसवांनी, किरण बुटले, भारती दुधानी,संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे,सचिन कोतपल्लीवार,रवी लोणकर, दिनकर सोमलकर, विशाल निंबाळकर, दीपक भट्टाचार्य, चंदन पाल, सूर्यकांत कुचनवार,मोहन चौधरी ,रघुवीर अहिर, सोपान वायकर,श्याम कनकम, प्रदीप किरमे, वंदना संतोषवार,सारिका संदूरकर,पूनम गरडवा, रंजना नाकतोडे,शीतल आत्राम,अनिल फुलझले, प्रमोद शास्त्रकार,चांदभाई पाशा,प्रशांत कोलप्याकवार, मनोरंजन रॉय,आशा अबोजवार,राजेंद्र आडपेवार,विनोद शेरकी,शशिकांत मस्के,राजू जोशी, रंजना उमाटे,मनोज सिंघवी रामकुमार आकपल्लीवार, विकास खटी,रवी चहारे,संदीप देशपांडे, पूनम तिवारी, धनराज कोवे, अरविंद कोलनकर, प्रलय सरकार, वनिता डुकरे,संगीता खांडेकर, जहीर शेख, नकुल आचार्य, राजेश मंगरुळकर, सुनील डोंगरे, यश बांगडे, प्रवीण उरकुडे, कुणाल गुंडावार, महेश कोलावार, पूनम तिवारी, गिरीधर येडे, सुरेश हरिरामनी, राजेंद्र खांडेकर, दशरथ सिंग ठाकूर, मंजुश्री कासंगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, संजय पटले, प्रणय डबारे,विक्की मेश्राम, विनय कावडकर, शांताराम भोयर,परितोष मिस्त्री, मधुकर राऊत, आकाश मस्के,अक्षय शेंडे, सत्यम गाणार, संजय निखारे,पराग मलोडे,रामजी हरणे,नितीन बिश्वास, संजय धवस,शुभम शेगमवार यांची उपस्थिती होती. Bjp won
यावेळी ढोल तश्याच्या गजरात थिरकत 'मोदीजी आगे बढो,सुधीरभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है,भारत माता की जय,वंदे मातरम चा जयघोष करीत आनंद व्यक्त केला.कार्यकर्त्यांनी अभिर गुलाल उधळला. यावेळी लाडू-पेढे देखील वितरित करण्यात आले.
Election result
हा प्रखर राष्ट्रवाद,सुरक्षा व विकासाचा विजय..डॉ गुलवाडे
जनतेने 5 पैकी 4 राज्यात प्रचंड बहुमत दिले. गोव्यात 40 पैकीब20,उत्तराखंडात 70 पैकी 48, उत्तर प्रदेश येथे 403 पैकी268 तर मणिपूर यथे 60 पैकी 30 जागांवर भाजपाचा झेंडा रोवल्या गेला. प्रखर राष्ट्रवाद,सुरक्षा व विकासाचा हा विजय आहे. इतर राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी यातून बोध घेत विकासाचे राजकारण करावे,असे आवाहन डॉ.गुलवाडे यांनी केले.