प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर :- भाजपाचे महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी "माझ्या हाती महाराष्ट्राची सत्ता द्या! मी तीन महिन्यात ओबीसींना आरक्षण मिळवून देतो" हे विधान केले. कायद्यानुसार जनगणना हा विषय Indian census act 1948 नुसार पूर्णतः केंद्र सरकारच्या अधीन आहे व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे असलेल्या केंद्रातील सरकारकडे ओबीसीच्या जनगणनेसाठी आग्रह धरण्याऐवजी महाराष्ट्रातील सत्तेची त्यांची हौस भागवण्यासाठी व ओबीसीं समुदायाला नेहमीप्रमाणे मूर्ख बनविण्यासाठी हे विधान जाणीवपूर्वक केल्याचे जाणवते. 2021 हे जनगणनेचे वर्ष आहे या वर्षी जनगणना होणे क्रम:प्राप्त आहे परंतु अजूनही केंद्र सरकारने त्यासंबंधी निर्णय घेतलेला नाही.
उलट देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींना खरेच न्याय द्यायचे असेल तर केंद्र सरकारने जनगणनेचा अध्यादेश काढून त्यामध्ये एससी, एसटी सोबत ओबीसी हा कलम देखील अंतर्भूत करावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. परंतु तसे न करता "मी पुन्हा येईल" या त्यांच्या सत्तापिपासू मानसिकतेला शोभेल असे विधान करून ओबीसी समुदायाला फसवण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. 2009 मध्ये देवेगौडा सरकारने एकमताने ओबीसी जनगणनेचा घेतलेला निर्णय तेरा दिवसांच्या वाजपेयी सरकारने रद्द केला व 2011 मध्ये संसदेने एक मताने घेतलेला निर्णय काँग्रेसच्या केंद्रातील सरकारने बदलवून Cast Swwag या नावाखाली Indian census Act 1948 ला बाजूला करून NGO मार्फत राबविण्यात आला व त्यावर 4800 कोटी रुपये खर्च केले. तो Swwag 2014 नंतरही मोदी सरकारने 2015 पर्यंत सुरू ठेवला. ज्या Swwag ने हा डाटा तयार केला आहे त्यामध्ये 9 कोटी चुका आहेत व तो Indian census Act 1948 च्या अंतर्गत तयार न केल्यामुळे तो Athantic नाही त्यामुळे तो प्रसिद्ध करण्यात आला नाही. महाराष्ट्र सरकारने मात्र 2019 च्या पावसाळी अधिवेशनात ठराव करून त्याचा इन्पोरियल डाटा द्यावा ही विनंती करून पुन्हा या तीन पायाच्या सरकारनेही ओबीसींना फसवले आहे. या शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांचेवर कडाडल्या.

संघटन समिक्षा व संवाद यात्रा च्या निमित्य वचिंत चे उपाध्यक्ष गोविंद दळवी यानी संघटन बांधणी वर ज़ोर देत कार्यकर्त्यांचा आढावा घेतला व महिला सरचिटणीस शिरसाटताई यांनी महिला संघटन बांधनी साठी महिला ना संबोधित केले. या कार्यक्रम मध्ये विद्रर्भ पदाधिकारी डॉ रमेश ग़ज़बें ,कुशल मेश्राम, राजु झोडे, अरविंद सांदेकर,राजु लोखंडे उपस्थित होतो कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हाअध्यक्ष डॉ गावतूरे यांनी केलं तर संचालन जयदिप खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता नी परिश्रम केले.