मूल :— अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती परंतु अचानक रविवारी सायंकाळच्या सातच्या सुमारास आलेल्या पावसामुळे रस्ते आणि नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी चक्क नागरिकांच्या घरात शिरले. गुडघाभर पाणी घरात जमा झाल्याने वॉर्डवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा फटका येथील वार्ड क्रमांक 9 आणि 10 मधील जनतेला रविवारी रात्रीच्या सुमारास बसला.
मूल येथे विकास कामांतर्गत वॉर्डावॉर्डात सिमेंट रस्ते आणि नाल्या बनविण्यात आल्या आहे.मात्र,हे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही.सिमेंट पाईपने नाल्या तयार करण्यात आल्या आहे.
रस्ते व नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.दरम्यान मूल येथे रविवारी रात्रीच्या सुमारास मेघगर्जने सह मुसळधार पाऊस झाला. यावेळी रस्तावरचे पाणी नालीमध्ये न जाता नागरिकांच्या घरात जमा झाले. याचा वार्ड क्रमंाक 9 आणि 10 येथील सुभाष नगरातील रहिवाशांना मोठा फटका बसला.
तसेच जुन्या वस्ती मधील जुने रेल्वे स्टेशन विश्रागगृहाजवळील रोडच् या खुल्या प्लॉटवर पावसाच्या पाणी सोचल्याने डूुकराचा वावर निर्माण झालेला आहे साचलेला पाणी जाण्यासाठी कुठच मार्ग नसल्याने तिथे पाणी साचून असल्यामुळे डेंगू, मच्चर, डास यांचा त्रास नागरीकांना होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
घरातील संपूर्ण खोल्या पावसाच्या पाण्याने वेढत्या गेल्या.नागरिकांना आपल्या घरातील सामान उंच ठिकाणी ठेवावे लागले.घरातील पाणी काढता—काढता ब—याच लोकांच्या नाकी नऊ आले.
पावसाचे पाणी घरात शिरल्याने वॉर्डात एकच हाहाकार माजला. याबाबत कळताच मूलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार डॉ.रविंद्र होळी यांनी तात्काळ रात्रीच घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता ज्या महिलेच्या घरात पाणी साचले, त्या महिलेला काहीतरी द्यावे, अशी मदतीची मागणी करुन पुन्हा मोठा पाऊस आला, तर माझे घर ओलाव्याचे पडेल करिता पाणी घरात येऊ नये यासाठी नगर परिषद प्रशासनाला तशी सूचना द्यावी अशी विनंती देखील महिलेने केली आहे.