चंद्रपूर :- चंद्रपुर शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले असुन त्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने महापौर चंद्रपुर यांना मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून केली आहे. चंद्रपुरातील महाकाली कॉलरी व परिसरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून संबंधित खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत येथून ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना या रस्त्यावरुन चालणे अवघड झाले असून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इतकेच नाही तर पाइपलाइनच्या खोदकामामुळे ठिकठिकाणी पाणी साचुन असते याचा नाहक त्रास येथील नागरिकांना होत आहे त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी जातिने लक्ष द्यावे व बागला चौक ते महाकाली कालरी आणी रय्यतवारी कालरी बिएमटि चौक ते मानवेंद्र बायपास रोड चे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे जेणेकरून येथील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. #News34 आपल्या स्तरावर योग्य चौकशी करून संबंधित रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम नव्याने लवकर सुरू करा अशी मागणी निवेदनातून केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे, विविध भागात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून त्याठिकाणी खड्डे खोदल्यावर रस्ता तसाच ठेवल्या जात आहे तर काही ठिकाणी नुकतेच बनलेले रस्ते सुद्धा खोदण्यात आले, या सर्वांचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे, काम झाल्यावर रस्ता व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
खोदलेल्या रस्त्यावर धुळीचे प्रदूषण होत आहे, नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे, मात्र मनपा प्रशासन यावर गप्प असून "हाच आमचा विकास" म्हणत मौन बाळगून आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हा अध्यक्ष सुनिता गायकवाड , जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, महिला सेना जिल्हा सचिव अर्चना आमटे, शहर उपाध्यक्षा वाणि सदालावार, तालुका उपाध्यक्ष क्रिष्णा गुप्ता,तालुका उपाध्यक्ष मनविसे प्रविण शेवते, शैलेश सदालावार इत्यादी मनसैनिक उपस्थित होते.

