News34 chandrapur
चंद्रपूर - 2 वर्षापासून देशात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला होता, तब्बल 2 वर्षांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 31 मार्चपासून देश निर्बंधमुक्त होणार असे गृह मंत्रालयाने घोषित केले. No Summer vacationकोरोना काळात शाळा, कॉलेज संपूर्णतः बंद करण्यात आले होते, विद्यार्थ्यांना त्यावेळेस Online classes च्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरविले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता शाळा, कॉलेज सुरू करण्यात आले असून यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळणार की नाही याबाबत शिक्षण विभागाने महत्वाची घोषणा केली आहे.
आज शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती (schools open with 100%) सह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. (School reopen in Maharashtra). मात्र यामुळे यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांना (No summer vacations in Maharashtra schools) मुकावं लागणार आहे.
शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवडयात विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे. इतकंच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी मिळणार नाही असंच दिसतंय.
शिक्षण विभागाकडून इयत्ता पहिली ते इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षा या एप्रिल महिन्यातील तीसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भर उन्हात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. संपूर्ण एप्रिल महिना हा शाळा अभ्यास आणि परीक्षांमध्ये जाणार आहे.