प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर :- येथील गौरक्षण वॉर्डातील आज दि.15 ऑक्टोबर ला धमचक्र प्रवर्तन व विजया दशमी Vijaya dashami निमित्त कार्यक्रमाचे आयोजन सौ.वनिता रायपूरे यांनी केले,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केंद्रीय शिक्षिका आयु,माणिनी कैविषताई मेश्राम तसेच ऍड.रमण पुणेकर आणि उपस्थित, तनज केशकर उपस्थित होते. तथागत गौतम बुध्द, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सौ.माटे म्याडम यांच्या हस्ते मालाअर्पण करण्यात आले तसेच ध्वजारोहनचा कार्यक्रम आयु.माणिनी कैवीशताई मेश्राम यांनी केले, उपस्थित असलेले ऍड.रमन पुणेकर यांचा स्वागत लक्ष्मी शेंडे यांनी केले तर केशकर यांचा स्वागत चंद्रकला तावाडे यांनी केले आणि माणिनी कैविशताई यांचा स्वागत सौ.काजल जामुळे यांनी केलं तसेच खोब्रागडे यांचा स्वागत उमरेताई यांनी केलं गायत्री रामटेके यांचा स्वागत सविता साखरे यांनी केलं.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.सारिका दर्योधन यांनी केलं,मान्यवरांचे मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे देण्यात आले.
