कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
दालमिया व्यवस्थापनाने पुर्वीच्या मुरली सिमेंट कंपनीतील उर्वरीत कामगारांना अविलंब सामावून घ्यावे,कार्यालयीन वर्गातील उर्वरित कर्मचाऱ्यांना सेवा बहाल करावी,कामगारांना त्यांची कार्यक्षमता व अनुभवाच्या आधारे देऊ केलेल्या वेतनात सुधारणा करून त्वरीत न्याय द्यावा.ओ & एम मध्ये समान सुविधा उपलब्ध करण्यास त्रृटी दूर करून त्यात सुधारणा करावी. पॅकींग प्लांट मध्ये पुर्वीच्या मुरली कामगारांना आवश्यकतेनुसार प्राधान्य द्यावा यासह अन्य मागण्या पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दालमिया व्यवस्थापनास चर्चेदरम्यान केल्या.गडचांदूर येथील एरीगेशन विश्रामगृहात २१ आगस्ट रोजी अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत नारंडा सिमेंट काममगार संघटना व दालमिया व्यवस्थापनाची बैठक पार पडली. Hansraj ahir
कामगार संघटनेकडून खुशाल बोंडे, राजू घरोटे,देवराव निंदेकर,वासूदेव बेसूरवार,साईनाथ सोनटक्के,दिपक भोस्कर,नथ्थजी बोबडे,सूनील जीवने, विलास टोंगे यांनी तर व्यवस्थापनाच्या वतीने अली,भुसारी,कोल्हटकर, पामपट्टीवार यांनी प्रतिनिधीत्व केले.या बैठकीत चर्चेदरम्यान पूर्व गृहराज्यमंत्राी महोदयांव्दारे सुचविलेल्या सर्वच मागण्यांबाबत अविलंब अंमलबजावणी केली जाईल असे व्यवस्थापनाने कामगार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मान्य केले. मुरलीच्या अधिकांश पूर्व कामगारांना न्याय मिळाला असून जे कामगार रूजू होण्यास तयार नाही अशांना वगळून उर्वरीत कामगारांना त्यांच्या पुर्वीच्या विभागातच त्यांच्या शिक्षण व अनुभवानुसार पुनर्नियुक्ती द्यावी, ठेकेदारी कामगारांना नियमित काम मिळण्याची मागणी अहीर यांनी केली.बैठकीत कामगारांच्या न्यायविषयक बाबींवर सकारात्मक चर्चा झाल्याने कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.