ताजी बातमी - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात सुरू असलेली संचारबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
सांगली येथील पूरग्रस्त भागाचा दौरा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंतच दुकाने सुरु आहेत.दुकाने सुरु असण्याची वेळ वाढवावी अशी मागणी व्यापारी बांधवांकडून करण्यात आली होती.त्यामुळे राज्यात आता दुकाने 8 वाजे पर्यंतच सुरु असणार असे आदेश आज काढण्यात येणार. परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे त्याच ठिकाणी हे आदेश लागू होतील.आणि ज्या ठिकाणी अद्याप कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध कायम असणार असं मुख्यमंत्री म्हणाले.
#news34